Wednesday, 11 March 2020

विनायक प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिन साजरा २०२०

*जिजाऊ, सावित्री, रमाई, अहिल्या महिलांचा स्वाभिमान*-  सौ.किर्तीताई पांगारकर
बीड दि-८ मार्च (बीड प्रतिनिधी) जागतिक महिला दिन शहरातील विनायक प्राथमिक शाळेत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाचे उध्दघाटन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ किर्तीताई पांगारकर,भारती क्षीरसागर मॅडम,मुंडे महानंदा मॅडम यांच्या शुभहस्ते क्रांतीज्योती सावित्री,राष्ट्रमाता जिजाऊ,लोकनेत्या स्व. केशरकाकूं क्षीरसागर यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलनाने सुरुवात करण्यात आली. महिला दिनाच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. गणेश भागडे सरांनी करून जागतिक महिला दिनाचे महत्त्व विषद केले. एक महिला घराला घरपण देते,आधार देते,कष्टणाऱ्या वेदना ती सहन करत कुटुंबाचा कणा ती असते.महिला आज आपले अस्तित्व टिकवून समाजाला पुढे नेते आहे,सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये तिचे योगदान अतुलनीय आहे.आई,बहीण, पत्नी,मुलगी या नात्यांमध्ये ती तिची भूमिका बजावत असते असे प्रतिपादन शाळेचे शिक्षक अजिंक्य चांदणे सरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.आई म्हटलं की मनामध्ये चांगल्या विचारांची प्रतिमा दिसून येते.आई आपल्याला जन्म देऊन संस्कारमय बनवण्यात तिचा मोलाचा वाटा असतो.'स्वामी तिन्ही जगाचा,आई विना भिकारी' आई शिवाय या जगात मोठे कुणी नाही.माझ्या आईचे स्वप्न साकार करण्यासाठी मी अनेकांना त्यांच्या आईचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहील यामुळेच माझ्या आईला खूप आनंद होईल त्यासाठी मी सदैव अग्रेसर राहील हीच माझ्या आईला जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सदिच्छा ठरेल अशा मौलीक विचारभावना अशोक काशीद सरांनी आपल्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त केल्या.मुलगी म्हणजे पित्याच व आईच काळीज असतं.हृदयात घर करत असत.लाडक्या मुलीच्या आगमनाने घरामध्ये लक्ष्मी नांदत असते.अंगणामध्ये बाग फुलवणारी,रांगोळी साकारणारी ती एक कलेचा सागर असते.मुलीच आई बापावरील प्रेम खूप असतं.सासरला जातांना मनातल्या मनात सर्व काही दाटल्यासारखं  होतं.. चैतन्य, वात्सल्य, माया ,ममता ही प्रत्येक मुलींच्या स्वभावात असतं ते आईबापांच्या काळजाचा तुकडा असतं. बदलत्या सामाजिक परिस्थिती नुसार तिच्यावर लादलेली बंधन आज कुठं कमी झाली आहेत.. आई बापाचा विश्वास ती असते.सासरला गेल्यानंतर आई,वडील,भाऊ, बहीण हे काळजीच आपुलकीच नात कायम टिकवून राहतं.लेक वाचवा,देश वाचवा यासाठी मुलींच्या जन्माचे स्वागत करून तिचे स्वप्न साकार करण्यासाठी सकारात्मक विचार ठेवा असे प्रतिपादन विवेक गव्हाणे सरांनी महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून  मनोगत व्यक्त केले. महिलांच्या महतीचे विविध स्फूर्ती गीते, काव्यगायन गाऊन शाळेतील विविध शिक्षक,शिक्षिकांनी सादर करून नारी शक्तीच्या विचारांची गुंफण केली.तुच जिजाई, तुच रमाई,तुच अहिल्या तुच सावित्री या महिलांच्या कार्याचा वसा आणि वारसा हा महिलेचा आदर व स्वाभिमान आहे. या थोर माता महिलांचे अस्तित्व आहे.त्यांचे विचार,संस्कार,आदर्श आजही महिलांना सामर्थ्य व शक्ती देत आहेत.एक उत्तम स्त्री एक आई बनते, बहीण बनते,मुलगी बनते,एक पत्नी बनते.घरादाराच सारं सारं ती बघत असते.तिलाही भावना असतात,प्रेम असते,माया असते ती सर्वांसाठी धडपडते, कुटुंबातील सर्वांची काळजी घेते.ती वेगवेगळ्या भूमिका बजावत,शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेते.जिजाऊ,सावित्री, अहिल्या, रमाई हा तिचा स्वाभिमान आहे हा कर्तृवाचा वारसा आणखी फुलवणारी व जोपासणारी महिलाच असते असे प्रतिपादन आपल्या अध्यक्षीय भावना जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकरांनी व्यक्त करून जागतिक महिला दिनाच्या उपस्थित महिलांना शुभेच्छा दिल्या. हा जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या वर्षभरातील उल्लेखनीय कार्य केल्यामुळे शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताईंना 'विनायक कोहिनूर' व शाळेतील शिक्षिका सौ.वर्षा म्हेत्रे मॅडम यांना 'विनायक स्टार' हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये जागतिक महिला दिनाचे यशस्वी निवेदन तन्वीर पठाण सरांनी केले तर उपस्थितांचे आभार शैला बावस्कर मॅडम यांनी मानले..




Thursday, 20 February 2020

स्व. सोनाजीराव क्षीरसागर उर्फ नानांची जयंती2020

*स्व.सोनाजीराव क्षीरसागर(नाना)केशरकाकूंचे आधारस्तंभ होते*-सौ किर्तीताई पांगारकर
(बीड प्रतिनिधी)-दि.१५ फेब्रुवारी रोजी विनायक प्राथमिक शाळेत स्व.सोनाजीराव क्षीरसागर उर्फ नाना यांची जयंती साजरी करण्यात आली.स्व.सोनाजीराव क्षीरसागरांच्या प्रतिमेचे पुजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यांनी करून अभिवादन केले. यावेळी शाळेच्या जेष्ट शिक्षिका मुंडे मॅडम,भारती क्षीरसागर मॅडम, शाळेतील सर्व  शिक्षक शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.शाळेचे शिक्षक अशोक काशीद सर,तन्वीर पठाण सरांनी स्व.सोनाजीराव क्षीरसागरांच्या सामाजिक, राजकीय,शैक्षणिक योगदानाची माहिती शाळेतील  विद्यार्थ्यांना करून दिली.स्व.सोनाजीराव क्षीरसागर उर्फ नाना हे एक उत्तम पैलवान होते,व्यायामाची आवड असल्यामुळे भारदस्त शरीरयष्टीचे मल्ल सुप्रसिद्ध होते.आपल्या पत्नीला राजकीय योगदानाची संधी देण्यात सिहांचा वाटा त्यांचा होता.स्वतःपाठीमागे राहून स्व.केशरकाकूंना राजुरीच्या सरपंच पदापासून ,बीड पंचायत समिती सभापती,सलग तीन वेळेस बीडच्या खासदार,आशिया खंडातील पहिल्या महिला गजानन साखर कारखान्याच्या अध्यक्षा,शैक्षणिक संस्था अशा विविध राजकीय, सामाजिक क्षेत्रामध्ये स्व.सोनाजीराव क्षीरसागरांची भक्कम अशी साथ लाभली.स्व.सोनाजीराव क्षीरसागर उर्फ नाना लोकनेत्या स्व.केशरकाकूंचे एक आधारस्तंभ होते.आपल्या जीवनाचे सार्थक करून त्यांनी दाखवले.ग्रामीण भागामधील लोकांना आयुर्वेदिक वनऔषधी सांगत होते.आपल्या परिवारावर त्यांचा धाक होता,दबदबा होता म्हणूनच त्यांनी संपूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेमध्ये समर्पित केले.स्व.सोनाजीराव क्षीरसागर उर्फ नानांच्या जयंती निमित्त अभिवादन करून आपल्या भावना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केल्या.या जयंती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वर्षा म्हेत्रे मॅडम यांनी केले तर आभार श्रीमती वाघमारे मॅडम यांनी मानले.

विनायक प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी२०२०

*विनायक प्राथमिक शाळेत शिवजयंती उत्साहात साजरी*
(बीड प्रतिनिधी)- दि.१९ फेब्रुवारी रोजी विनायक प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करून शिवजन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उपस्थित राहून शिवरायांच्या नामाचा गजर करण्यात आला.





Saturday, 15 February 2020

विनायक प्राथमिक शाळेचा सह्याद्री देवराई येथील वृक्षसंमेलनात सहभाग २०२०

*विनायक प्राथमिक शाळेचा सह्याद्री देवराई येथील 'वृक्ष संमेलनात' सहभाग*
बीड प्रतिनिधी-बीड दि-१४ फेब्रुवारी- विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक,शिक्षिका यांनी सह्याद्री देवराई येथील वृक्ष संमेलनास उपस्थित राहून वृक्ष लागवड या उपक्रमात सहभागी झाले. शाळेतील मुला मुलींनी वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांची लागवड केली.झाडाविषयी माहिती,उपयुक्तता समजून घेऊन त्यांचे संवर्धन करणे काळाची गरज लक्षात घेऊन सहयाद्री देवराई चा सिने अभिनेते सयाजी शिंदे व अरविंद जगताप यांनी राबवलेला उपक्रम पर्यावरणासाठी समतोल राखण्यासाठी खुप महत्वाचा आहे.त्यांचं हे कार्य उद्याच्या भारताच्या भविष्यासाठी आदर्श आहे हे या देवराईच्या उपक्रमातून दिसून येत आहे. विनायक प्राथमिक शाळेचा संपूर्ण शिक्षक वृंद या सह्याद्री देवराईच्या उपक्रमात सहभागी होऊन फुल न फुलांची पाखळी सदैव आपल्या स्मृरणात राहावी म्हणून शाळेच्या वतीने वेगवेगळ्या प्रकारची विविध झाडे लावून तिचे संवर्धन करण्याचा मानस शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी मनोदय व्यक्त करून शाळेतील प्रत्येक  विद्यार्थ्यांनी झाडे लावून सह्याद्रीच्या देवराईच्या पावन भागामध्ये आपली आठवण म्हणून झाडे लावून ती जगवण्याची प्रतिज्ञा आपण करूया सयाजी शिंदेच्या या स्तुत्य उपक्रमात सहभागी होऊन उज्वल भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी 'झाडे लावा,झाडे जगवा हा संदेश अंमलात आणला पाहिजे. वाढते प्रदूषण, वाढती वाहनांची संख्या, वाढती लोकसंख्या,वाढती वृक्षतोड,वाढती कारखानदारी यामुळे पर्यावरनावर अनिष्ट परिणाम झालेला दिसून येत आहे.निसर्गाचे नैसर्गिक चक्र बदलले आहे,अवेळी पाऊस पडतो आहे, दुष्काळाच्या कायम झळा सोसाव्या लागतात,शेतीवर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो आहे त्याचा परिणाम उत्पादनावर होतो आहे, लोकसंख्येच्या तुलनेत त्याचे प्रमाण घटले आहे,यामुळे महागाई वाढली आहे,विकासदर खुंटला आहे, हा परिणाम फक्त मानवनिर्मित प्रदूषणामुळं निर्माण झाला आहे यावर वेळीच उपाययोजना आपण करायला पाहिजे तेच आपल्या हाती आहे, त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करून तिचे संवर्धन करणे आवश्यक आहे अशी माहिती विद्यार्थ्यांना सौ.किर्तीताई पांगारकर यांनी करून दिली.शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी यांनी सह्याद्री देवराई च्या वृक्ष संमेलनात सहभाग घेऊन निसर्गाची आपण काळजी घेतली पाहिजे हा संदेश मनात घेतला व तो अंमलात आणण्याचा संकल्प केला...




Saturday, 1 February 2020

विनायक प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन व पालक मेळावा संपन्न२०२०

*विनायक प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न*
बीड-दि.३०जानेवारी(बीड प्रतिनिधी)-  शहरातील पेठ बीड विभागातील विनायक प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन व विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे उद्धघाटन डॉ.सारीकाताई योगेश क्षीरसागर यांच्या शुभ हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी,स्व.माजी खासदार केशरकाकूंच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी पेठ बीड पोलीस निरीक्षक विश्वासराव पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर, नगरसेवक विकास जोगदंड,सय्यद इलियास, मुन्ना इनामदार, संभाजी प्रा.शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.विनाताई भोज,भारतीताई क्षीरसागर मॅडम,पत्रकार इम्रानजी शाह साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी स्नेहसंमेलन कार्यक्रमाची रूपरेषा मांडली व शाळेच्या शैक्षणिक वर्षभर राबवलेल्या विविध उपक्रमाचा आढावा घेतला व पालकांशी संवाद साधला.विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर कौशल्यपूर्ण,कलागुण विकसीतपूर्ण शिक्षण मिळणे महत्वाचे आहे असे आपल्या मनोगतातून पोलीस निरीक्षक विश्वासराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, हा उद्देश समोर ठेवून आपण शिक्षण दिले तर नक्कीच  शिक्षणाचे महत्त्व लक्षात येईल,संभाजी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.विनाताई भोज मॅडम,यांनी ही या स्नेहसम्मेलनाच्या प्रसंगी आपले विचार व्यक्त केले. विनायक प्राथमिक शाळा हे काकूंनी लावलेले छोटेसे रोपटे मोठ्या वटवृक्षात रुपांतरीत झाले आहे. शाळेच्या भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे हे आमचे कर्तव्य आहे.पुढील काळात विनायक प्राथमिक शाळेची नवीन इमारत नक्कीच बांधू असे आश्वासन कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.सारिकाताई क्षीरसागर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून भावना व्यक्त करत, स्नेहसंमेलनाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका सर्व विद्यार्थी,पालक,शिक्षक,शिक्षिका यांचे कौतुक केले.इयत्ता बालवाडी ते ४ थी पर्यंतच्या प्रत्येक वर्गातील मुला मुलींनी या स्नेहसम्मेलनामध्ये सहभागी होऊन आपल्या अंगी असणारे गुणप्रदर्शन उत्साहपूर्ण नृत्याने करून उपस्थित मान्यवर, प्रमुख पाहुणे, विविध शैक्षणिक, सामजिक, राजकीय क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांना,पालक वर्ग यांना मंत्रमुग्ध केले.आपल्या कलागुणांचे उत्कृष्ट असे नृत्य मूल मुली करत होती व उपस्थितांची वाहवा मिळवत होती.देशभक्ती गीत,पारंपरिक नृत्य,ग्रामीण जीवनाची गाणी,लोकगीत,गौळण,पोतराज,देवदेवतांची गाण्यावर,कोळीगीत,स्वच्छता संदेश देणाऱ्या गाण्यावर मूल हुभेहुब आपल्या कलेचे चित्रण करत होती.अतिशय देखने,उत्कृष्ट असे स्नेहसंमेलन विनायक प्राथमिक शाळेमध्ये संपन्न झाले.हा स्नेहसंमेलन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक ,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.या स्नेहसम्मेलनाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन अशोक काशीद सरांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार तन्वीर पठाण सरानी मानले.









Saturday, 25 January 2020

विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. किर्तीताई पांगारकर यशवंतराव होळकर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित...२०२०

*विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांना 'यशवंतराव होळकर' आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान*...
दि-१९ जानेवारी(बीड प्रतिनिधी) शैक्षणिक, सामाजिक कार्याच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल जयमल्हार सामाजिक प्रतिष्ठान चा राजे 'यशवंतराव होळकर' राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्कार विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांना बीड जिल्ह्याचे लोकप्रिय लोकनेते माजी मंत्री मा.जयदत्त (अण्णा)क्षीरसागर साहेब, समाजसेविका सिंधुताई सपकाळ,मा.माजी मंत्री महादेव जानकर यांच्या शुभहस्ते आज बीड येथे प्रदान करण्यात आला यावेळी शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातील, विविध पुरस्कारप्राप्त मान्यवरांची उपस्थिती होती.जयमल्हार सामाजिक प्रतिष्ठानचा हा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा अतिशय उत्साहात बीड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, बीड येथे संपन्न झाला..।

Tuesday, 14 January 2020

विनायक प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी२०२०

विनायक प्राथमिक शाळेत राजमाता जिजाऊ,स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी*... 
दि-१२ जानेवारी (बीड प्रतिनिधी)- राष्ट्रमाता ,राजमाता जिजाऊंचा जन्मदिवस सोहळा विनायक प्राथमिक शाळेत आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.किर्तीताई पांगारकर, प्रमुख पाहुणे श्री.उत्तरेश्वर भारती सर, वैजिनाथ गिराम सर,श्रीमती सुनीता चौधरी मॅडम,शैलजा बावस्कर मॅडम,भारती क्षीरसागर मॅडम यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पुजन करून जन्मोत्सव सोहळा कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.प्रथम जिजाऊंचे स्फूर्ती गीत गाऊन विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. जिजाऊंच्या जीवन कार्य आदर्श,पराक्रम,स्वाभिमान, कर्तबगारी, विचार, सर्वधर्म समभाव असणाऱ्या व्यक्तिमत्वाचा आढावा श्री.अशोक काशीद सरांनी प्रास्ताविकातून घेतला.शाळेतील विविध मुली जिजाऊंच्या वेशभूशा करून लक्ष वेधत जिजाऊंचे व्यक्तीमत्वास साकारत होत्या.शाळेतील शौर्य क्षीरसागर, अजमत शेख, समीर शेख, पठाण कासीम, आरे आरोही, शेख माहीन, आरे आदर्श, शेख आरेज, वेताळ पायल,गायकवाड कुणाल,होसमाने आस्था, या मुलांनी राजमाता जिजाऊं बद्दल आपले विचार व्यक्त केले.हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणाऱ्या आपल्या कार्याने शिवरायांच्या रूपाने प्रत्यक्षात हिंदवी स्वराज्य स्थापन,साकार करून घेणाऱ्या जिजाऊ एक कर्तबगार राजमाता होत्या असे वैजीनाथ गिराम सरांनी आपल्या मनोगतातून जिजाऊंच्या कार्याला गौरविले. आपल्या स्वाभिमानाने कठोरातले कठोर रितशीर निर्णय क्षमता असणाऱ्या जिजामाता कधीच मागे हटल्या नाहीत असे जिजाऊंच्या कार्याचे वर्णन शाळेच्या श्रीमती बावस्कर मॅडम यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.जिजाऊंच्या आदर्शरूपी, जनतेविषयी असणारी आत्मीयता,भावना आपल्या खास शैलीत भारती क्षीरसागर मॅडम यांनी मांडल्या. तन्वीर पठाण सरांनी शिवरायांना घडवणाऱ्या व हिंदवी स्वराज्य निर्माण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेऊन जनतेच्या मना मनातल्या आदर्श अशा जिजामाता खरोखरच एक महान राष्ट्रमाता होऊन गेल्या असे आपल्या अभ्यास पूर्ण विचारातून जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवन कार्याची सखोल माहिती मनोगतातून व्यक्त केली. श्रीमती सुनीता चौधरी मॅडम, बाळू काळे सर,दिलीप तकीक सर,शिवलिंग क्षीरसागर सर,अजीजराजा शेख सर,अजिंक्य चांदणे सर, विवेक गव्हाणे सर,अमोल पाटोळे सर, अनिल लेहणे सर,प्रतिभा वाघमारे मॅडम,मनिषा चौधरी मॅडम,शारदा बहिरमल मॅडम,संजीवनी पवळ मॅडम,सिमा उदगीरकर मॅडम,रिता वाघमारे मॅडम,मंगल क्षीरसागर मॅडम,महानंदा मुंडे मॅडम यांनी जिजाऊंच्या जीवनकार्यावर सखोल मार्गदर्शन केले.राजमाता जिजाऊ यांच्या नावातच खासियत आहे.शिवरायांच्या आई जिजाऊ धन्य झाल्या,त्यांच्या पोटी शिवबांनी जन्म घेऊन जिजाऊंनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे देखणे स्वप्न साकारले. शिवरायांना घडवणाऱ्या राजमाता होत्या.स्वाभिमान, कर्तबगारीने, सडेतोड निर्णय क्षमता हे गुण त्यांच्या अंगी होते.जनतेला प्रेम, न्याय, जिंव्हाळा,आपुलकी दाखवणाऱ्या जिजाऊं खरोखरच एक रत्न व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जातात.आजही जिजाऊंच्या कार्याचे अभिमानाने गोडवे गायीले जाते असे त्यांचे महान कार्य आपल्याला प्रेरक, प्रेरणा देणारे उत्साह वाढवणारे आहे.जिजाऊ नसत्या तर नसते घडले शिवराय,नसते स्थापन करता आले हिंदवी स्वराज्य. निजामशाही,आदिलशाही, मुघलशाही उलथवून भारतीय मातृभूमीतून निष्ठेचा बाण निघावा आणि गणिमावर तो अग्नी म्हणून बरसावा असे केव्हढे अलौकिक शौर्य जिजाऊंच.इतिहासाच्या कालपटलावर स्त्री व्यक्तिमत्वाचा ठसा उमठवणाऱ्या एकमेव राजमाता, शिवरायांच्या माता आपणा सर्वांच्या राजमाता जिजाऊंना कोटी कोटी वंदन हे जिजाऊंचे आदर्श, प्रेरणा, विचार सदैव जिवंत ठेवू ,युवकांचे प्रेरणास्थान अभ्यासू स्वामी विवेकानंद यांचे कार्य खूप मोलाचे आहे त्यांचा जन्मदिवस आपण युवक दिन म्हणून साजरा करत आहोत आहे असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी विचार व्यक्त केले.कार्यक्रमाची सांगता जिजाऊ वंदनाने करण्यात आली.जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे खूप सहकार्य लाभले.या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री.गणेश भागडे सरांनी केले तर आभार श्रीमती वर्षा म्हेत्रे मॅडम यांनी मानले.









Friday, 3 January 2020

विनायक प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती साजरी..२०१९



*विनायक प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी*
बीड- दि.३जानेवारी(बीड प्रतिनिधी)- स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या,आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस विनायक प्राथमिक शाळेत 'बालिका दिन' म्हणून साजरा करण्यात आला.जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, विद्येची देवता सरस्वती, लोकनेत्या माजी खासदार सौ. केशरकाकू क्षीरसागर यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले.शाळेतील सर्व मुलींचे बालिका दिनाचे औचित्य साधून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.आद्यशिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या शैक्षणिक, सामाजिक कार्याचा आढावा शाळेचे शिक्षक श्री.अनिल लेहणे सरांनी प्रास्ताविकातून घेतला.शाळेतील काही मुली सावित्रीबाई फुलें च्या वेषभूषेत आली होती व कार्यक्रमाचे खास लक्ष वेधत होती. सावित्रीबाई फुलेंच्या कार्याचा जागर विविध मुला मुलींनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. यामध्ये कु.शेख माहीन गफार,होसमाने आस्था सुनील,आरे आरोही गणेश,चि.शेख समीर अब्बास,शेख अजमत गुलाब, शेख आरेज शकील,शेख सोफियान नसीर,आरे आदर्श गणेश,शेख जुनेद इस्माईल,सय्यद अलत्मश मुक्तार, गायकवाड कुणाल संदीप,पठाण कासीम कय्युम यांनी सावित्रीबाई फुलेंच्या सामाजिक शैक्षणिक योगदानाचे महत्व आपल्या भाषणांतून व्यक्त केले."जरी काळोख्या वाटा तरीही चालत सदैव जावे, जाता जाता या ओठावर, गीत क्रांतीचे गावे"या सावित्रीबाईंच्या कवितेतून शाळेच्या शिक्षिका संजीवनी पवळ मॅडमनी सावित्रीबाई फुलेंची महती गायली.शाळेतील शिक्षक अशोक काशीद सर, तन्वीर पठाण सर,बाळू काळे सर,शैला बावस्कर मॅडम,शिवलिंग क्षीरसागर सर,दिलीप तकीक सर,अमोल पाटोळे सर,गणेश भागडे सर,अजीजराजा शेख सर,भारती क्षीरसागर मॅडम,वर्षा म्हेत्रे



मॅडम,सुनिता चौधरी मॅडम,वैजीनाथ गिराम सर,मनिषा चौधरी मॅडम,अजिंक्य चांदणे सरांनी सावित्रीबाई फुलेंच्या विचारांची ज्योत विद्यार्थी मनांमध्ये पेटवली.या महिलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले ते सावित्रीबाईंनी.समाजातील अज्ञान,अंधार दूर करण्यासाठी सावित्रीबाईंनी खुप कष्ठ घेतले.ज्ञानाची,शिक्षणाची ही गंगा मुलींना खुप लाख मोलाची आहे.सावित्रीबाईंच्या विचाराचा,सामाजिक विचारांचा, शैक्षणिक कामाचा हा अनमोल वारसा "आम्ही सावित्रीच्या लेकी पुढे नेऊ, त्यांच्या कर्तव्याचा जागर, स्त्रियांच्या मनामनात करवू,तुझे स्वप्न सावित्रीचे साकार करू"  सावित्रीबाईंच्या फुलेंच्या विचाराने प्रभावित होऊन स्व.लोकनेत्या माजी खा.केशरकाकू क्षीरसागरांनी एक महिला म्हणून केलेल्या शैक्षणिक, सामाजिक कार्याचा गुणगौरव आपल्या अध्यक्षीय मनोगतातून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी भावना व्यक्त केल्या व सावित्रीबाई फुलेंच्या विचारांची प्रेरणा,शक्ती,ऊर्जा देणाऱ्या स्फूर्ती गीतातून सावित्रीबाई फुलेंना आदरांजली वाहिली.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विवेक गव्हाणे सरांनी केले तर आभार शारदा बहिरमल मॅडम यांनी मानले.