Wednesday, 17 July 2019

विनायक प्राथमिक शाळा,गुरुपौर्णिमा2019 कार्यक्रम

गुरू ज्ञानाचा सागर,गुरू विश्वाचा आधार-सौ.किर्तीताई पांगारकर
दि-१६ जुलै(बीड प्रतिनिधी)-  विनायक प्राथमिक शाळा पेठ बीड येथे गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर,प्रमुख पाहुणे भारतीताई क्षीरसागर,शिवलिंग क्षीरसागर,उत्तरेश्वर भारती सर,अजिंक्य चांदणे सर,यांनी शिक्षणाची देवता सरस्वती,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, शाळेच्या प्रेरणास्थान गुरुतुल्य,वंदनीय स्व. केशरकाकू क्षीरसागर यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. गुरुपौर्णिमेचे महत्व व उद्देश, संकल्पना, भूमिका शाळेचे श्री.विवेक गव्हाणे सरांनी आपल्या प्रास्ताविकातून विषद केली.शाळेतील मुलां-मुलींनी आपल्या गुरुवर्यांचा पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता भाव व्यक्त केला. विविध मुलांनी आपल्या शिक्षकांविषयी आदरयुक्त भावना व्यक्त केल्या.लहान लहान मुले खुप उत्साहाने बोलत होती.शाळेचे शिक्षक श्री.तन्वीर पठाण सरांनी शिक्षकांविषयी आदरभाव व्यक्त होणारी गोष्टीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुरूंचे महत्व पटवून दिले.याप्रसंगी शाळेचे श्री.बाळू काळे सर, अशोक काशीद सर,शिवलिंग क्षीरसागर सर, दिलीप तकीक सर, शैला बावस्कर मॅडम, सुनीता चौधरी मॅडम, मनीषा चौधरी मॅडम,सिमा उदगीरकर मॅडम,संजीवनी पवळ मॅडम, प्रतिभा वाघमारे मॅडम यांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना संबोधित केले. गुरू ज्ञानाचा सागर आहे गुरू विश्वाचा आधार आहे .गुरुविन जीवन प्रगती करू शकत नाही,माझ्या आधार गुरुतुल्य स्व.काकूंच्या प्रेरणेन,माझ्या गुरुजनांमुळे मी घडले व पुढे आले आहे.विद्यार्थी घडवणारा खरा शिक्षक खुप महत्वाचा असतो,गुरूंनी दिलेली ज्ञानाची शिदोरी ही आयुष्यभराची असते ती संपत नसते, गुरू,शिक्षक हे जीवनाचे शिल्पकार असतात त्यांचा आदर, सन्मान विनम्रता ठेवणे शिष्यांचे,विद्यार्थ्यांचे कर्तव्य असते.सर्व गुरुवर्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा,गुरूंनी शिकवलेल्या संस्काराची, ज्ञानाची आपण जपणूक करून ती पुढे चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे हे गरजेचे आहे ,अशा महत्वपूर्ण भावना शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केल्या.या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्री.गणेश भागडे सरांनी केले तर आभार श्रीमती शारदा बहिरमल मॅडम यांनी मानले.






















Sunday, 14 July 2019

विनायक प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी निमित्ताने बालदिंडी निघाली..

*विनायक प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी निमित्त बालदिंडीचे आयोजन*
दि-१२जुलै(बीड प्रतिनिधी) आषाढी एकादशी निमित्ताने विनायक प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी विठुमाऊलीच्या जयघोषाने सुंदर अशा दिंडी सोहळ्याचे आयोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली  केले.शाळेतील लहान लहान मुलां- मुलीं हुबेहूब विठ्ठल रुक्मिणी च्या वेशभूषेत आले होते.टाळ मृदंगाच्या नादामध्ये हरिनामाचा जागर शाळेमध्ये असमात दुमदुमत होता.वारकऱ्यांच्या वेशभूषेतील मुलं-मुली दिंडीचे लक्षवेधुन घेत होती.शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका यांनी अतिशय सुंदररीत्या आषाढी एकादशी निमित्ताने दिंडी सोहळ्याचे यशस्वी आयोजन केले शाळेचा परिसरामध्ये पांडुरंगाच्या जयघोष व आनंद लहान लहान मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी दिंडीतील सहभागी विद्यार्थ्यांचे शिक्षक शिक्षकांचे खुप कौतुक केले.बालमनावर अभ्यासाबरोबर शांतीसाठी,एकात्मतेसाठी ,चांगले संस्कार करण्यासाठी अध्यात्मातून गोडी निर्माण करून संस्कारित पिढी निर्माण करणे ही काळाची गरज लक्षात घेऊन लहानपणापासूनच असे उपक्रम शाळेत राबवतो त्यासाठी विनायक प्राथमिक शाळा नेहमी नवोपक्रम राबवत असते.सुंदर अशा दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यासाठी व सहभागी विद्यार्थी, शिक्षक,शिक्षिका,पालक वृंद यांनी उत्कृष्ट पणे साथ दिल्याबद्दल आभार व्यक्त करून आषाढी एकादशी निमित्त सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा देऊन पांडुरंगा चरणी चांगला पाऊस पडू दे अशी प्रार्थना केली.या दिंडी सोहळ्यामध्ये शाळेचे सर्व शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.















Wednesday, 3 July 2019

*विनायक प्राथमिक शाळेत मोफत शालेय गणवेश वाटप*2019

दि-२ जुलै (बीड प्रतिनिधी)आदर्श शिक्षण संस्था संचलित विनायक प्राथमिक शाळेतील इयत्ता १ली ते ४ थी च्या सर्व मुला-मुलींना मोफत शालेय गणवेश वाटपाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता.शाळेच्या प्रमुख सौ. किर्तीताई पांगारकर,आदर्श शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. भारतीताई क्षीरसागर यांच्या शुभहस्ते स्व. काकूं-नाना क्षीरसागर यांच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.या मोफत शालेय गणवेश वाटपाचा मुख्य उद्देश व संकल्पना आपल्या खास शैलीत श्री.तन्वीर पठाण सरांनी उपस्थित विद्यार्थी पालकांसमोर मांडली.शाळेतील शिक्षक श्री. शिवलिंग क्षीरसागर सर, श्री.दिलीप तकीक सर,बाळू काळे सर,उत्तरेश्वर भारती सर, वैजीनाथ गिराम सर,अशोक काशीद सर,अनिल लेहणे सर,अजिंक्य चांदणे सर,अजीजराजा शेख सर,प्रतिभा वाघमारे मॅडम, रिता वाघमारे,मनिषा चौधरी मॅडम, सुनीता चौधरी मॅडम,मंगल क्षीरसागर,महानंदा मुंडे मॅडम,शैला बावस्कर मॅडम, सिमा उदगीरकर मॅडम, संजीवनी पवळ मॅडम,शारदा बहिरमल मॅडम,अमोल पाटोळे सर यांनी आपापल्या वर्गातील मुला-मुलींना गणवेश वाटप केले.उपस्थित विद्यार्थी पालक,प्रमुख पाहुणे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.किर्तीताई पांगारकर यांनी शाळेतील प्रत्येक मुलां-मुलींना मोफत शालेय गणवेश भेट दिला.शाळेच्या स्थापनेपासून स्व.माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर यांची या शाळेविषयी असणारी तगमगता खुप लाख मोलाची होती.स्व.काकूंनी हे विनायक प्राथमिक शाळेची केलेली स्थापना या पेठ भागातील दिन-दलित, पिडीत, गोरगरीब लोकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी केलेली एक विलक्षण,अनमोल सोय होती.सर्वांसाठी शिक्षण हा त्यांचा मुख्य उद्देश होता.या भागातील लोक गरीब आहेत, मजूर आहेत, कष्टकरी आहेत, अठरापगड जातीधर्माचे लोक या शालेय परिसरात राहतात त्यांच्या मुला-मुलींसाठी आपली एक शाळा असावी हा दृष्टिकोन ठेवून,कल्पक व प्रेरक सामाजिक, शैक्षणिक योगदानाची आगळीवेगळी ओळख आजही कायम लोकांच्या मनात घर करून आहे.त्यांच्या याच विचाराने आम्ही प्रभावीत होऊन या शैक्षणिक संकुलामध्ये फुलं न फुलांची पाखळी आमच्या शाळेच्यावतीने देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करतोत. यावर्षी पासून शाळेच्या गणवेशामध्ये आम्ही बदल केला आहे.सर्व जातीधर्माची, गोरगरीब घरांतील मुल एकाच गणवेशात दिसावी वं फुलावी यासाठी आम्ही शाळेतील इयत्ता १ ते ४ पर्यंतच्या सर्व मुलां-मुलींना मोफत शालेय गणवेश,बुट,सॉक्स,बेल्ट, टाय देत आहोत.शाळेमध्ये आम्ही वेगवेगळे प्रत्येक उपक्रम राबवतो.त्यासाठी पालकांचा सहभाग ही महत्वाचा असतो त्याशिवाय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास शक्य नाही.तुमची साथ अशीच राहू द्या.विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी आम्ही नवनवीन नवोपक्रम राबवतो.भविष्यातील भविष्य हे विद्यार्थी हेच आहेत.त्यासाठी सतत आमचे प्रयत्न चालू आहेत असे आपल्या अध्यक्षीय मनोगतातून सौ. किर्तीताई पांगारकर यांनी शाळेच्या भुमिका स्पष्ट केल्या. उपस्थित पालकांच्या काही सुचना व प्रतिक्रिया जाणून घेऊन त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पालकांना आश्वसित केले.शालेय गणवेश वाटप झाल्यानंतर शाळेतील मुला-मुलींचा आनंद खुप काही सांगत होता.अतिशय खेळीमेळीच्या, आनंदाच्या वातावरणामध्ये शाळेतील हा मोफत शालेय गणवेश वाटपाचा कार्यक्रम रंगला होता. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलांचे योगदान होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.भागडे सरांनी केले तर उपस्थित मान्यवर अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, विद्यार्थी पालकांचे आभार श्री.विवेक गव्हाणे सरांनी मानले.