Wednesday, 19 December 2018

विज्ञान प्रदर्शन 2018 बातमी

*विनायक प्राथमिक शाळेत विज्ञान प्रदर्शन महोत्सव 2018 संपन्न*

बीड--दि.19 सप्टेंबर रोजी विनायक प्राथमिक शाळा पेठ बीड येथे बीड तालुका गटशिक्षणाधिकारी श्री.मोराळे साहेब, सरस्वती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री.जरांगे सर, विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीताई पांगारकर यांच्या हस्ते,जेष्ठ विस्तार अधिकारी श्री. पवार सर,क्षीरसागर सर,शिंदे सर,विनायक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सपकाळ सर, उपमुख्याध्यापक श्री.सपाटे सर, श्री. सचिन भोज सर,रामकुंड प्रा.शाळेचे मुख्याध्यापक श्री.देवमाने सर,नवगण प्रा.शा.बीड चे मुख्याध्यापक श्री.वाघ सर, संभाजी प्रा.शा.शिवाजीनगर, बीड च्या मुख्याध्यापिका श्रीमती भोज मॅडम, अशोकनगर केंद्रप्रमुख श्री. पठाण सर,गटसाधन केंद्राचे श्री. पवार सर, यांच्या प्रमुख उपस्थितीत विज्ञान प्रदर्शन महोत्सवाचे उदघाटन संपन्न झाले उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत विनायक प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीताई पांगारकर व विनायक माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सपकाळ सर यांनी केले.याप्रसंगी शाळेतील मुला-मुलींनी वेगवेगळे प्रयोग सादर केले.विद्यार्थ्यांनी आपला कल्पक दृष्टिकोन लक्षात ठेवून पारंपरिक शेती व आधुनिक शेती तंत्र, पाणी आडवा पाणी जिरवा,हवेचे वेगवेगळे गुणधर्म,स्मार्ट सिटी, पवन ऊर्जानिर्मिती, सोलर ऊर्जा निर्मिती,हवेचे रॉकेट, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करणे, मिक्सर बनवणे, कुलर बनवणे,जंगली प्राणी-पाळीव प्राणी, मातीचे उपयोग,कुंभारकाम, विविध शैक्षणिक शब्दांचे चार्ट, जीवनसत्वे, विविध फळांचे,आकाशगंगा, संगणक, चवीचे गुणधर्म,रंगकाम,अंक ओळख, दिशादर्शक यंत्र, भूकंपसूचक यंत्र, फुफ्फुस कार्य तपासणी यंत्र,पक्षी पकड यंत्र, पाण्याचे गुणधर्म, हवेला दाब असतो, मनोरंजनात्मक व कलात्मक असे वेगवेगळे प्रयोग या विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी दाखवून  प्रात्यक्षिक करून त्या प्रयोगाबद्दलची माहिती करून दिली. या विज्ञान प्रदर्शनासाठी शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर पालकांचा सहभाग खूप मोठा होता. या विविध प्रयोगाने विद्यार्थ्यांना खूप आनंद वाटत होता. त्यांच्या कल्पनेला वाव व व्यासपीठ मिळवून दिले आनंददायी शिक्षणाचे महत्त्व, अशा विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजते. आत्मविश्वासाने प्रयोगाचे यशस्वी सादरीकरण करत होते. आपल्या शोधक कलेतून वैज्ञानिक, चिकित्सक वृत्ती या गुणांना वाव अशा विज्ञान प्रदर्शनातून निश्चितच विद्यार्थ्यांना प्रेरणा देतो.अभ्यासाची आवड, गोडी निर्माण होत असते. अत्यंत खेळीमेळीने,कुतहुलाने ही मुले आपले प्रयोग सादर करत होती. बीड चे गटशिक्षणाधिकारी श्री. मोराळे साहेबांनी विज्ञान प्रदर्शनातील सर्व विद्यार्थ्यांचे प्रयोग मोठ्या कौतुकाने पाहत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले,शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रयोगाची संपूर्ण माहिती घेऊन,विनायक प्राथमिक शाळेने आयोजित केलेल्या  विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वी नियोजन, केल्याने कौतुक केले.
  या सर्व विज्ञान प्रदर्शन महोत्सवासाठी शाळेतील सर्वश्री शिक्षक,शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी खूप मेहनत घेऊन विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या उपजत कला सादर केल्या.




Saturday, 8 December 2018

लोकनेते जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्याविषयी विशेष मनोगत

*जयदत्त आण्णा क्षीरसागर एक कुशल नेतृत्व राजुरी(न) गावात जन्मलेले एक अतुलनीय व्यक्तीमत्व आपल्या कार्यामुळे जनतेच्या अविरतपणे असणाऱ्या प्रेमामुळे एक उमलत नेतृत्व उभा राहीले आहे.. बीड जिल्ह्यातील एक थोरले घर म्हणून या घराकडे पाहिले जाते... राजकारणाचे अनेक अष्टपैलू बाळकडू स्व. लोकनेत्या केशरकाकू क्षीरसागर यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील लोकांच्या मना मनातील हृदयात पोहचलेल एक असामान्य व्यक्तिमत्व अविरतपणे विकास हाच ध्यास, विकास हाच धर्म, विकास हीच जात समजून सर्व समाजातील, धर्मातील लोकांना बरोबर घेऊन काम करत  आहे... आज पर्यंत आपल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगाराची व नोकरीची संधी उपलब्ध करणारे जयदत्त अण्णा क्षीरसागर एक आजातपुरुष आहे... गजानन साखर कारखाना, गजानन सूतगिरणी, गजानन सहकारी बँक बीड बाजार समिती, बीड दूध संघ, पं. स.,जि. प. यांच्या माध्यमातून प्रत्येक क्षेत्रातील आपल्या कौशल्याची ओळख करून देतात... निवडणुकीपूरते राजकारण व नंतर फक्त समाजकारण व विकास यासाठी त्यांचे विरोधी पक्षातील असूनसुद्धा त्यांना मानाचे स्थान असते... स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नंतर आज बघितले तर अण्णासाहेबाकडे पाहावे लागेल.. आजही त्यांच्या नावाचा दबदबा, रुबाब कायम आहे.. अनेक मातब्बर नेते आज अण्णांच्या विचारांना मानतात, बीड जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचे मार्गदर्शन नेहमीच महत्वाचे असते.. लाखो लोकांच्या प्रत्येक सुख दुःखात आण्णा सदैव बरोबर असतात..
हजारो लोकांच्या हाताला काम देणारा, हजारो लोकांच्या घरात उद्योगधंदे निर्माण करून आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नवनवीन संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध संधीचे सोने करणारे जयदत्त आण्णा यांचे निपुण भविष्यातील वेध घेणारे ध्येय साध्य करणारे ठरतात...आजच्या या परिस्थिती मध्ये आपल्या उत्कृष्ट नियोजन असल्यामुळे भल्या भल्या
 राजकारणातील रथी, महारथीनां  आपल्या शांत व संयमी दूरदृष्टीने, चाणाक्ष पद्धतीने आपलेसे करणारे नेते जयदत्त अण्णा क्षीरसागर आज जिल्ह्यातील धुरंधर लोकनेते आहेत... समाजातील वंचित ,उपेक्षीत लोकांच्या बरोबर असणारे, कार्यकर्त्याला बळ देणारे बीड जिल्ह्यातील लोकांच्याहृदयात आहेत... वादळे येतात..जातात पण क्षणभर सुद्धा आपल्या विकासाच्या ध्यासाचा वसा न सोडता आज ते मार्गक्रमण करत आहेत... संघर्ष, शक्ती, व संघटन कौशल्य आत्मसात असणारे अण्णा धुरंधर योद्धे आहेत...आपल्या बीड तालुका ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील प्रमुख असणाऱ्याकार्यकर्त्यांच्या नावांची तोंडपाठ ओळख असणारे व्यक्तिमत्व किती विलक्षण आहे हे दिसून येते... जुन्या व नवीन कार्यकर्त्यांची सांगड घालून विकासाचा हा महापुरुष आज समाज मनात व ग्रामीण जीवनात बदल घडवणारा अभियंता आमदार आहेत... आपल्या जनमानसातील स्वच्छ प्रतिमा, शांत व संयमी स्वभावाने ते नेहमीच आपल्या कामात व्यस्त असतात.. बीड जिल्ह्यातील विकासासाठी आपल्या कल्पक दूरदृष्टीने मोठं मोठे प्रकल्प हाती घेऊन जनतेच्या सेवेसाठी सामाजिक बांधीलकी समजून मोफत महाआरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रमघेऊन सदैव ते प्रयत्नशील असतात...
क्षेत्र कोणतेही असो आम्ही विकासासाठी सदैव पुढे राहू ही भूमिका ठेवून त्यांची विकासाची गंगा वाहत असते... आजही क्षीरसागरांचा बंगला सदैव 24 तास जनतेच्या अडीअडचणी  सोडवणारा घरांचा दबदबा खूप काही प्रेरणा देतो.विकासाची ही गंगा वाहती ठेवून, आपल्या अथक, कल्पक दूरदृष्टी असणारे लोकनेते जयदत्त अण्णा क्षीरसागर यांचे कार्य खूप मोठे आहे..बीड शहराचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर,डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर, डॉ.विठ्ठल क्षीरसागर,परिवारातील सर्व सदस्य अण्णांच्या पाठीमागे खंभीरपणे उभे आहेत... स्व.काकू नाना क्षीरसागर यांचा सक्षमपणे वारसा चालवणारे विकासाचे महामेरू जयदत्त अण्णा क्षीरसागर साहेबांच्या वाढदिवसाच्याप्रसंगी त्यांच्या कामाचे मूल्यांकन शब्दात वर्णन करण्यासाठी शब्द अपुरे पडत आहे.. अशा शांत,संयमी सदैव तत्पर असणाऱ्या,  समाजसेवेचा  वसा, विकासाचा एकच ध्यास घेऊन सर्वसामान्यांच्या मना मनातील लोकनेता आ.जयदत्त(अण्णा) क्षीरसागर साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा*...
               🖋गव्हाणे विवेक

जयदत्त अण्णा क्षीरसागर साहेबांचा वाढदिवसविशेष

*विनायक प्राथमिक शाळेत आ.जयदत्त (अण्णा) क्षीरसागरांचा वाढदिवस साजरा*....
  बीड- दि-7 डिसेंबर 2018  रोजी विनायक प्राथमिक शाळेत लोकनेते आ.जयदत्त अण्णा क्षीरसागर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले , शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीताई पांगारकर यांच्या मार्गदर्शनाखाली कब्बडी, खोखो, विज्ञान प्रदर्शन, रांगोळी, प्रश्नमंजुषा, दोरीवरच्या उड्या, संगीतखुर्ची, अशा स्पर्धा झाल्या, या स्पर्धेमध्ये शाळेतील सर्व मुलांनी सहभागी होऊन प्राविण्य मिळवले.. या प्रसंगी झालेल्या बक्षीस वितरण समारंभातून बीड जिल्ह्याचे भाग्यविधाते आदर्श शिक्षण संस्थेचे सचिव आ.जयदत्त अण्णा क्षीरसागर यांच्या जीवनकार्याचा आढावा श्री. भागडे सरांनी करून दिला.जयदत्त अण्णा म्हणजे एक कर्मयोद्धा.. आपल्या कामात सतत अग्रेसर.. आपल्या शांत व संयमी व्यक्तिमत्वाने जनतेच्या मनात राज्य करणारे जयदत्त अण्णा क्षीरसागर सदैव विकास हीच जात, विकास हाच धर्म हे ब्रीद ठाणून जनतेच्या कल्यानाचा घेतलेला ध्यास पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रांच्या माध्यमातून पूर्ण करत आहेत .अण्णासाहेब हे एक अदभूत दूरगामी,शांत व संयमी व्यक्तिमत्व, स्व.खा केशरकाकू क्षीरसागर यांचा विकासाचा भगीरथ अविरतपणे चालवणारा कर्मयोद्धा, राजकीय ,सामाजिक, आध्यात्मिक क्षेत्रांतून जनतेचा आर्थिक विकास करण्यासाठी रात्रीचा दिवस एक करताहेत हे अवघड काम सहज पेलावत आपल्या नावाचा दबदबा संबंध बीड जिल्ह्यातील लोकांच्या मना मनात अखंडपणे कायम ठेवून स्वाभिमान व रुबाबदार बाणा जपला आहे. आण्णासाहेबांच्या माध्यमातून आज हजारो विद्यार्थी आपल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागात विनामूल्य शिक्षण घेत आहे. आज हजारो युवक याठिकाणी नोकरी करत आहेत.समाजातील प्रत्येक घटकावरती अण्णांचे विशेष लक्ष असते.त्यांच्या कल्पनेतून आज बीड जिल्हा विकासाच्या माध्यमातून प्रगती करत आहे हे अविरत काम करत आहेत येथुनपुढेही क्षीरसागरांचा बंगला सदैव आपल्यासोबत असेल या वाढदिवसाच्या प्रसंगी अण्णांना चांगले आरोग्य, तुम्ही आमचा आधारस्तंभ आहात, आपणांस दीर्घायुष्य लाभो.. ही प्रार्थना करते 68 व्या वाढदिवसाच्या तुम्हां सर्वांतर्फे, माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा शाळेच्या मुख्याध्यापिका किर्तीताई पांगारकर यांनी आपले विचार व्यक्त करून या वाढदिवसाप्रसंगी शाळेतील मुलांना बक्षीस, शैक्षणिक साहित्य वाटप करून जयदत्त अण्णांच्या जीवनकार्याची संपूर्ण माहिती आपल्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केली.याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक श्री.भारती सर,शिवलिंग क्षीरसागर, काळे सर,  काशीद सर, तकीक सर, चांदणे सर, श्रीमती भारती मॅडम,चौधरी मॅडम,वाघमारे मॅडम,म्हेत्रे मॅडम, मुंडे मॅडम, बावसकर मॅडम, चौधरी मनीषा मॅडम, रिता वाघमारे मॅडम, तन्वीर पठाण सर,गव्हाणे सर, गिराम सर, बहिरमल मॅडम, लेहणे सर, अजीजराजा शेख सर, पाटोळे सर, शहेबाज शेख सर,लक्ष्मण फुलमाळी मामा,चव्हाण लक्ष्मण, नईम पठाण सर यांनी जयदत्त ( अण्णा) क्षीरसागर यांच्या कार्याचा आपापला अनुभव शब्दामध्ये व्यक्त करून वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. शाळेतील सर्व मुलामुलींना फळांचे वाटप करण्यात आले. विविध शैक्षणिक साहित्य या वाढदिवसाच्या प्रसंगी सर्व मुलां मुलींना वाटप करून जयदत्त अण्णा क्षीरसागर साहेबांचा हा 68 वा वाढदिवस खूप उत्साहात शाळेत संपन्न झाला.
   हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे खुप सहकार्य लाभले, कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन भागडे सरांनी केले तर उपस्थितांचे आभार श्रीमती पवळ मॅडम यांनी मानले